मंगलवार, 8 जनवरी 2019

लोकसभा शिवसेना स्वबळावर लढणार. आता युती नाही


मुंबई - आमागी लोकसभा निवडणुकीत शिवसेना स्वबळावरच लढणार असल्याचा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कायम ठेवला असून स्वपक्षाच्या खासदारांनाही तशा प्रकारचा ‘अिल्टमेटम’ दिला आहे. ज्यांना युतीवरच भरोसा आहे त्यांनी स्वबळावर लढायचे की नाही याचा निर्णय घ्यावा. शिवसेना मात्र स्वबळावरच लढणार आहे, अशा शब्दांत पक्षप्रमुखांनी खासदारांना बजावले असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुखांच्या या निर्धारामुळेच अखेर भाजप अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्र्यांनीदेखील शिवसेनेबाबत प्रथमच आक्रमक होत लातूरच्या मेळाव्यात प्रतिहल्ला केल्याचा दावा सूत्रांनी केला. राज्यात व केंद्रात सत्तेत असतानाही शिवसेनेने भाजपला सतत कडवा विरोध कायम ठेवला. तरीही शिवसेना युती करेल अशी आशा भाजपच्या सर्वच नेत्यांनी वारंवार बोलून दाखवली होती. मात्र, यावेळी लोकसभेत भाजप सोबत युतीने लढायचे नाही, असे स्पष्ट आदेशच पक्षप्रमुखांनी खासदारांना दिल्याची माहीती आहे. ज्या खासदारांना युती व्हावी असे वाटते त्यांना उद्धव ठाकरे यांनी नुकतेच युतीचा विचार सोडण्याचे बजावले आहे. युती केल्यास शिवसेनेला भाजपचा लाभ होतो असा दावा केला जात असला तरी शिवसेनेचाही लाभ भाजपला मोठ्या प्रमाणात होतो अशी यामागे अटकळ बांधली आहे. त्यातच भाजप नेत्यांच्या एककेंद्री कारभाराने मागील पाच वर्षात शिवसेनेला सतत सावत्रभावाची वागणूक मिळाल्याचे चित्र आहे. त्यामुळे युतीची गरज शिवसेनेला आहे तशीच ती भाजपला देखील असल्याचे मानले जाते. मनोबल खचू नये म्हणून...
जानेवारी २०१७ मध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात पहिल्यांदा स्वबळाचा नारा दिला होता. त्यानंतर पक्षाच्या सर्वच बैठका व सभांमध्ये त्यांनी याची पुनरावृत्ती केली होती. तरीही शिवसेना अखेरच्या क्षणी युती करेलच असा दावा भाजपच्या वतीने करण्यात येत होता. मात्र, आता युती केल्यास शिवसैनिकांचे मनोबल खचेल व त्याचा सर्वाधिक फटका शिवसेनेलाच बसेल अशी चर्चा असून त्याबाबत उद्धव ठाकरेदेखील सहमत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे काहीही झाले तरी युती होणार नाही. शिवसेना स्वबळावरच निवडणुका लढेल असे या सूत्रांनी स्पष्ट केले.

शनिवार, 5 जनवरी 2019

शिवसेनेचा लोकसभा दौरा व प्रवेश सोहळा


#हिंगोली_लोकसभेत झंझावत दौरा #सेनगाव_तालुका
#मा_श्री #आनंदराव_जाधव_साहेब #संपर्कप्रमुख हिंगोली
जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत व #हिंगोली_लोकसभा_
संघटक तथा हिंगोली लोकसभेचे #शिवसेनेचे_उमेदवार #
मा_श्री #डॉ_बी_डी_चव्हाण_साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत
#सेनगाव_तालुक्यातील_पाच_गावामध्ये शाखा अनावरण सोहळा
पार पडला व  #हजारो_कार्यकर्त्यांनी  #शिवसेनेत_प्रवेश_केला यावेळी
उपस्थित भैय्या पाटील गोरेगावकर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती
रामेश्वर दादा शिंदे दिलीप दादा बांगर शिवसेना उपजिल्हाप्रमुख  संदेश भाऊ देशमुख
 युवा सेना  जिल्हाप्रमुख  दिलीप भाऊ घुगे शिवसेना  तालुकाप्रमुख संतोष देवकर पांडुरंग गुजर
  युवा जिल्हाउपप्रमुख उपनगराध्यक्ष प्रवीण महाजन व हजारो शिवसैनिक उपस्थित होते

मंगलवार, 1 जनवरी 2019

मोदी लाटेत निवडुन येनारा राजिव सातवचा खासदारकीचा मार्ग खडतर

Mahrastra maza news


हिंगोली लोकसभा : मोदी लाटेतही निवडून येणाऱ्या राजीव सातवांचा मार्ग खडतर
हिंगोली : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघाची मोठी चर्चा झाली. कारण, मोदी लाटेत एकीकडे काँग्रेसचा सुपडासाफ झाला, तर काँग्रेसचे उमेदवार राजीव सातव यांचा इथे विजय झाला. पण आता चित्र बदलल्याचं दिसत आहे. हिंगोलीमध्ये दर्जेदार शिक्षण, तरुणांच्या हाताला काम, रस्ते, पाणी, वीज, शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या अशा एक ना अनेक समस्या आहेत. 1999 साली परभणी जिल्ह्यातून हिंगोलीचं विभाजन करण्यात आलं. पण 20 वर्षातही हिंगोलीला मागासलेला जिल्हा ही ओळख पुसता आलेली नाही.

हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव अशा पाच तालुक्यांसह हिंगोली जिल्हा तयार करण्यात आला. 20 वर्षांनंतरही या जिल्ह्यात शिक्षणाच्या, रोजगारांच्या समस्या कायम आहेत. येथील खासदारांना आजपर्यंत जिल्ह्याचं वेगळं सिंचन किंवा जिल्ह्यासाठी वेगळी जिल्हा मध्यवर्ती बँकही आणता आली नाही. परभणीच्याच नावाखाली आजही हिंगोलीचं भरघोस सिंचन कागदोपत्री दाखवलं जातं. शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा जिल्ह्यातला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे.

राजीव सातवांचा जाहीरनामा आणि कामं

2014 च्या निवडणुकीपूर्वी खासदारांनी त्यांच्या जाहिरनाम्यात मुंबईसाठी आणि इतरत्र लांब पल्ल्याच्या नियमित रेल्वे गाड्या सुरू केल्या जातील, अकोला-खांडवा रेल्वे ब्रॅडग्रेजचं काम सुरू केलं जाईल, जिल्ह्यात शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग उभारले जातील, जिल्ह्यातील महामार्गावरील रस्ते तयार केले जातील, साडे तीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या माहुर तीर्थक्षेत्राचा औंढा नागनाथाचा आणि नामदेव महाराजांच्या नर्षीचा विकास करण्यात येईल असे एक ना अनेक आश्वासने दिली होती. खांडवा रेल्वे ब्रॉडगेजचं काम तर सुरू झालं, पण ते अत्यंत संथगतीने हे काम सुरू आहे. महामार्गावरील रस्ते होत आहेत, पण रस्त्यांचा प्रश्न भाजप सरकारने मनावर घेतलेला आहे. नरशी येथील मंदिरांचं काम सुरू आहे. पण त्यासाठी अनेक लोकप्रतिंनिधिंनी आपला निधी दिला आहे. यात खासदारांचं विशेष असं काही काम दिसून येत नाही.

अनेक प्रश्न सोडवणे अजून बाकी असले तरी राजीव सातव यांनी आमदारकीच्या काळात सीमा सशस्त्र बलाचा येलकी येथे कॅम्प आणलेला आहे. कळमनुरी येथे रुग्णालय आणलं आहे. लोकसभेत अनेक प्रश्नही लावून धरली. पण आमचं सरकार नसल्याने विकास करण्यास अडचणी येत असल्याचं कारण सातव पुढे करतात. जिल्ह्यातून पैनगंगा आणि कयाधू ह्या प्रमुख नद्या वाहतात. या नद्यांची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे. नदी जोड प्रकल्प अभियानात काम केले जाऊ शकत होते. कयाधू जीवंत करण्यासाठी सामाजिक संस्था जल दिंडी काढून जनजागृती करत आहेत. पण यात खासदारांचा सहभाग दिसून आला नाही. इसापूर, येलदरी आणि सिद्धेश्वर या धरणातील सर्वाधिक पाणी नांदेडने पळवलं आहे. कयाधू नदीवर कोल्हापुरी बंधारे उभारण्याची अनेक वर्षाची मागणी आहे. जिल्ह्यात मेडिकल कॉलेजची मागणी आहे. पण खासदारांनी यासाठी काही विशेष प्रयत्न केल्याचं बघायला मिळत नाही. हिंगोलीकरांनी सर्वाधिक पाच वेळा काँग्रेसच्या खासदारांना सत्ता देऊनही जिल्ह्यातले प्रश्न जैसे थे आहेत.

शिवसेनेच्या इच्छुकांची यादी

युतीत हिंगोलीची जागा शिवसेनेकडे आहे. प्रकाश पाटील देवसरकर लोकसभेसाठी इच्छुक आहेत. पण ते यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडचे असल्याने हिंगोलीकरांसाठी ते नवखे आहेत. शिवाय त्यांचा जनसंपर्क जास्त नाही. पण या मतदारसंघात सर्वाधिक मराठा मतदान असल्याने त्यांचीही जमेची बाजू आहे. त्यांचे या मतदारसंघात दोन आमदार आहेत. शिवाय प्रकाश पाटलांचा राजकीय वारसा त्यांची जमेची बाजू आहे.

डॉ.जयप्रकाश मुंदडा हे वसमतचे विद्यमान आमदार 2019 ची लोकसभा लढण्यास इच्छुक आहेत. पण त्यांचा म्हणावी तशी लोकसभा मतदारसंघावर पकड नाही. येथे जातीय समीकरणावर निवडणुका लढविल्या जातात. शिवाय पक्षांतर्गत त्यांना मोठा विरोध आहे. हा मतदारसंघ तसा शिवसेनेकडे झुकलेलाही आहे ही त्यांच्यासाठीची जमेची बाजू आहे. शिवसेनेकडून डॉ. बी. डी चव्हाण हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. व बंजारा समाज त्याच्या पाठीशी आहे. त्या मुळे शिवसेनेसाठी डॉ चव्हाण साहेब सक्षम ठरु शकतात. व बंजारा समाजीची वोटींग तीन लाख तेवीस हजार आहे.

किनवट, माहूर आणि औंढा नागनाथ या तालुक्यामध्ये त्यांचा समाज असल्याच्या जोरावर ते लोकसभेचं तिकीट मागत आहेत. यापूर्वी काँग्रेसकडून रामराव राठोड यांनी समाजाच्या आणि पक्षाच्या मतांच्या जोरावर सर्वाधिक काळ खासदारकी उपभोगली. भाजपकडून माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील इच्छुक आहेत. पण त्यांचा जनसंपर्क कमी झाला असून त्यांच्याकडे आता कार्यकर्त्यांची वानवा आहे. केंद्रीय मंत्री असताना त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यावरूनच पक्षश्रेष्ठी त्यांना उमेदवारी देतील यात सांशकता वाटते.

माजी खासदार शिवाजी माने यांनी दोन वेळ या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. पण त्यांच्या पक्ष बदलू धोरणाचा त्यांना फटका बसू शकतो. त्यामुळेच की काय 2014 मधील विधानसभेत त्यांना मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला होता. माजी खासदार सुभाष वानखेडे भाजपमधून  निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. पण मोदी लाटेत त्यांचा पराभव झाल्याने त्यांना पुन्हा संधी मिळण्याची आशा धूसर आहे. माहूर गडावरील शाम भारती महाराज आधात्माकडून राजकारणात येऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे काही करू पाहत आहेत. चक्क त्यांना मोदींनी फोन करून राजकरणात येण्याचे सुचविल्याचं सर्वत्र सांगत सुटलेत. पण त्यांच्या बोलण्यात तथ्य वाटत नसल्याने त्यांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता कमीच आहे. शिवाय त्यांना पूरक अशी ही राजकीय परिस्थिती सध्या तरी या मतदार संघात नाही.

या व्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयाचे विधीज्ञ शिवाजी जाधवही लोकसभेचं तिकीट पक्ष नेतृत्वाकडे मागत आहेत. ते मराठा असल्याने त्यांना येथील जातीय राजकारणांचा फायदा होऊ शकतो असं बोललं जातं. शिवाय ते उच्चशिक्षित असल्याने आणि त्यांच्या वडिलांच्या रूपाने त्यांना राजकीय वारसा लाभलेला आहे. टोकाई साखर कारखाना सुरू केल्याने आणि जिल्हा परिषदा निवडणुकीत केलेली भरीव कामगिरी त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग असून जाधव सातव एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले तर येथे चुरशीची लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आघाडीत हिंगोली कुणाला मिळणार?

राजीव सातव हेच काँग्रेसचे 2019 चे उमेदवार असणार आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसही या जागेवर आपला हक्क सांगत असल्याने येत्या काळात नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. देशात फुलत चाललेलं नेतृत्व, कार्यकर्त्यांची मजबूत फळी, जिल्ह्यातल्या छोट्या-मोठ्या राजकीय घडामोडींची असलेली जाणीव, तेवढ्या ताकदीचा जिल्ह्यात एकही नसलेला विरोधक हे राजीव सातवांसाठी जमेच्या बाजू आहेत. सातव यांचा मतदारसंघात कमी झालेला जनसंपर्क, देशात काम करणारं नेतृत्व असताना जिल्ह्यात उल्लेख करण्यासारख्या कामाचा अभाव, जिल्ह्यातले प्रश्न सोडवण्यात आलेलं अपयश, स्वपक्षासह सगळ्याच पक्षातून होत असलेला विरोध सातवांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. शिवाय मतदारसंघात सक्रिय असलेली जातीय समीकारणे, मतदारांच्या पूर्ण न झालेल्या अपेक्षा सातवांसाठी अडचणीच्या ठरू शकतात. 2019 मध्येही सातवांना लोकसभा जिंकायची असेल तर घाम, गाळावा लागणार आहे. पण त्यांच्या विरोधात कोण उमेदवार येतो यावरच ही सगळी गणिते अवलंबून असतील.

हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये एक वेगळं चित्र मागच्या काही दिवासांमध्ये पाहायला मिळालं. हिंगोली लोकसभेमधले उमरखेड आणि हिंगोली हे विधानपरिषद मतदारसंघ आहेत. भाजपाने पहिल्यांदाच या ठिकाणी मुसंडी मारली आणि दोन्ही ठिकानी ते काँग्रेसच्या हातून काढून घेतले.

भाजपचा प्रभाव वाढतोय ही बाब शिवसेना आणि काँग्रेस या दोघांच्याही जिव्हारी लागली. त्यामुळे हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये भाजपाला दूर करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्रित आली आणि हिंगोली जिल्हा परिषेदेची सत्ता स्थापन केली. ही अभद्र युती लोकांपुढे आली आणि सत्यासाठी आम्ही कधीही मित्र होऊ शकतो असा एक वेगळा संदेश या युतीच्या माध्यमातून दिला.

हिंगोली लोकसभा मतदारसंघाची रचना

हिंगोली लोकसभा मतदार संघ हा हिंगोली, यवतमाळ, नांदेड या तीन जिल्ह्यात विभाजलेला मतदार संघ आहे.

लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार

16 लाख 59 हजार 428 मतदार आहेत

पुरुष 08 लाख 70 हजार 700

महिला 07 लाख 88 हजार 700.

2014 मध्ये शिवसेनेचे -सुभाष वानखेडे यांना 4 लाख 65 हजार 765 इतकी मतं पडली होती. तर काँग्रेसचे विद्यमान खासदार राजीव सातव यांना 4 लाख 67 हजार 397 मतं मिळाली होती. मोदी लाटेत 1632 मतांनी राजीव सातव यांचा विजय झाला.

हिंगोली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदार संघ आहेत. त्यापैकी दोन शिवसेना, दोन भाजप, एक काँग्रेस आणि एक राष्ट्रवादीकडे आहे. स्थानिक स्वराज्य संस्था -नगर पंचायती सर्वाधिक भाजप-शिवसेनेच्या ताब्यात आहेत.

जातीय समीकरणे

वसमत विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आजपर्यंतच्या लढती मध्ये तुल्यबळ ठरले आहेत. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत शिवाजीराव जाधव यांनी ऐनवेळी भाजपात प्रवेश करून पहिल्यांदाच वसमत विधानसभेत तिरंगी लढतीची चुरस निर्माण केली.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधील गटबाजीचा आणि जातीय मत विभाजनाचा फायदा घेत त्यांनी प्रति स्पर्धी मातबर उमेदवाराबरोबर मते मिळवित जिल्ह्याचे लक्ष्य वेधून घेतले होते. मत विभाजनाच्या या निवडणुकीत शिवेसेनेचा निसटता विजय झाला होता.

यावेळी होणाऱ्या निवडणुकीतही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या प्रमुख पक्षांना अंतर्गत गटबाजीचं ग्रहण कायमच आहे. त्यामुळे मत विभाजनाचा नेमका फायदा कुणाला मिळेल ते युती-आघाडीच्या निर्णयानंतरच स्पष्ट होईल.

शिवसेना लोकसभा संपर्क दौरा सेनगाव तालुका

सेनगाव तालुक्यातील आज लोकसभा संपर्क दौरा-
साखरा सर्कल व हत्ता सर्कल
आमदार डॉ जयप्रकाशजी मुंदडा साहेब व शिवसेना जिल्हाउपप्रमुख
 संदेशराव देशमुख व पदाधिकारी करीत आहे.
हि निवडणुक शिवसेनेसाठी बालेकीला राखन्यासाठी महत्वाची आहे
व या वेळेस शिवसेनेची बाजु भकम दीसत आहे..
त्या मुळे शिवसेना घर तेथे कार्यकर्ता व गाव तेथे शाखेवर भर दीला आहे.





रविवार, 30 दिसंबर 2018

संत रेखेबाबा यात्रा कापडसींगीचा प्रारंभ

सेनगाव - संत रेखेबाबा यात्रा कापडसिंगी ला
आजपासुन सुरवात झाली. या यात्रेला हजारो भावीक
भक्त दर्शनासाठी कोसो मैल दुरुन येतात
यात्रा कमेटी नी चांगली व्यवस्था भाविकासाठी केली होती
यात महाप्रसादासाठी आलोट गर्दी बघायला मिळाली

गुरुवार, 27 दिसंबर 2018

सेनगाव पंचायत समिती पाणी टंचाई आढावा बैठक

सेनगाव -गुरुवारी पंचायत समिती सेनगाव येथे पाणी टंचाई  संदर्भात अतिशय महत्त्वाची बैठक मा हिंगोली विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार तान्हाजी मुटकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीला शिक्षण सभापती भय्यासाहेब देशमुख भाजपा जेस्ट नेते के के शिंदे काँग्रेस चे गटनेते विनायकराव देशमुख तहसीलदार पाटील मॅडम गटविकास अधिकारी काळे साहेब पंचायत समितीच्या सभापती  उपसभापती सेनगाव भाजपा तालुका अध्यक्ष अशोकराव ठेंगल जिल्हा उपाध्यक्ष सुर्यभानजी ढेंगळे जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल घोगरे तसेच सर्व डिपार्टमेंट चे प्रमुख अधिकारी सर्व ग्रामसेवक सर्व सरपंच उपसरपंच व प्रमुख नागरिक या बैठकीला उपस्थित होते या बैठकीत अतिशय चांगल्या प्रकारे पाण्याचा संदर्भात निर्णय घेण्यात आले सर्व काही बाबी वेळेवर सोडवण्यासाठी आमदार साहेब यांनी आदेश दिले आहे या वर्षीच्या पाणीटंचाई बाबत अतिशय चांगल्या प्रकारे बैठक आज सर्वांच्या साक्षिणे पार पडली व सर्व सरपंच ग्रामसेवक व सर्व नागरिकानी या बैठकीला मोठा प्रतिसाद दिला......

मराठा शिवसैनिक सेना व राष्ट्रीय समाज पक्ष छेडनार आंदोलन

हिंगोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी
दिनांक 3 जानेवारी 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय
गेटबंद आंदोलन मराठा शिवसैनिक सेना व राष्ट्रीय समाज पक्ष
 यांच्यावतीने आंदोलन करण्यात येणार आहे सर्व शेतकरी बांधवांनी
 हजर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे